[ad_1]
रायगड, 23 जून : इर्शाळवाडीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर सलग तिसऱ्या दिवशी बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफच्या पथकाकडून सुरू असलेली शोधमोहिम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती घेतली. प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर शोधमोहिम थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले. शोधकार्यात पावसामुळे येत असलेल्या अनेक अडचणी आणि इतर कारणांमुळे ही शोधमोहिम थांबवली जाणार आहे असं उदय सामंत यांनी सांगितलं. इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकजण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. तर २९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर आता शोधमोहिम थांबवण्यात आली आहे. याची माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे. दुर्घटनेत 57 जण बेपत्ता होते. त्यांना मृत घोषित करून आजपासून एनडीआरएफचे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले आहे. दरम्यान, बचावलेल्या 144 लोकांचे लवकरात लवकर पुनर्वसन केले जाईल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.
Breaking news : मुंबई पोलीस कट्रोल रूमला खळबजनक माहितीचा फोन; महाराष्ट्र एटीएस अलर्ट मोडवर
इर्शाळवाडीमध्ये बुधवारी रात्री साडेदहा ते आकराच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. गावावर दरड कोसळली. या घटनेत गावातील अनेक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं. तातडीनं बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. या घटनेत आतापर्यंत 29 जणांनी आपला जीव गमावला आहे. अद्यापही काही जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या चार टीम, एकूण 100 जवान, टीडीआरएफचे 80 जवान, स्थानिक बचाव पथकाच्या 5 टीम तसंच अनेक स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक मदत करत आहेत. स्थानिक माहितीवरून या आदिवासी वाडीमध्ये एकूण 48 कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या 228 इतकी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link